उरण : वार्ताहर उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर …
Read More »इतर आजारांवरही नवी मुंबई मनपाने लक्ष देण्याची गरज -निशांत भगत
नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसमोर त्यांच्या प्रभागातील महत्वाचे तीन मुद्दे मांडले. ज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम कोविड व्यतिरिक्त होणार्या आजारांवर लक्ष वेधले. चिकन गुनिया ह्या तापसदृश्य आजाराचा …
Read More »भाजप बेस्ट कामगार संघाची महाव्यवस्थापकांसोबत बैठक
पनवेल : वार्ताहर भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी झाली आहे.कुलाबा येथे सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यांपासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून …
Read More »वेगाने वाहन चालविणार्यांना दणका
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून 10115 वाहनांवर कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर …
Read More »शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची
डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …
Read More »एसटी कर्मचारी आर्थिक संकटात
महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ
श्रीवर्धन ः प्रतिनिधी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …
Read More »तणावापासून मिळवा मुक्ती
आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …
Read More »निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब
चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …
Read More »राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी
कर्जत भाजपचे आंदोलन कर्जत : प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली. अध्यादेश रद्द करावा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper