Breaking News

Ramprahar Team

वनवासी कल्याण आश्रमातील मुलांची अनोखी सफर

कर्जत : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबने बालदिनाचे औचित्य साधून जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहतील मुलांसाठी कर्जतजवळील वसंत हॉलिडेज फार्म हाऊस येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मुलांसह रोटरीचे सर्व सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिनेमा, स्विमिंग पूलचा आनंद, लज्जतदार जेवण आणि बरंच काही… जणू स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी …

Read More »

वार्षिक योजनेचा निधी 100 टक्के खर्चाबाबत कार्यवाही करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष 2019-20च्या कामांच्या तांत्रिक मान्यता प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी तसेच प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेतील कामे वेळेत सुरू करा. ज्या विभागांचा निधी अखर्चित राहणार असेल त्यांनी निधी …

Read More »

रायगडात सागर कवच अभियान

अलिबाग : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सागरी किनारी भागात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील …

Read More »

बालकांनी अन्यायाला घाबरू नका -डॉ. रणजित पाटील

खालापूर ़: प्रतिनिधी कायद्याने बालकांनाही या देशाचा सक्षम नागरिक म्हणून विविध अधिकार बहाल केलेले आहेत. पोलीस हा बालकांचा दुसरा पालक असून आपल्यावर कोणताही अन्याय होत असेल तर आमची जरूर मदत घ्या, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता …

Read More »

एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी

पुणे ः प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधून जाणार्‍या नाशिक-पुणे महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा बुधवारी (दि. 20) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण …

Read More »

आधार केंद्रे आठवडाभर राहणार खुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ’यूआयडीएआय’ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची. ’यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ’यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार …

Read More »

‘गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल’

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जे काही झाले ते नियमानुसारच झाले आहे, असे संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्याचा …

Read More »

इंटरनेट हवे की सुरक्षा?

काश्मीरप्रश्नी अमित शहांचा विरोधकांना प्रतिसवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित करणार्‍या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 20) आपल्या खास शैलीत उत्तर दिले. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे, मात्र काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत कारवाया अजूनही सुरू …

Read More »

एक्स्प्रेस वेवर तीन कार एकमेकांना धडकल्या

मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याच्या पुढे पुणे लेनवर तीन कार एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. यात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. पुढील कारला ओव्हरटेक करताना कार अनियंत्रित झाली व दुसर्‍या लेनवर गेली. दरम्यान, त्या लेनवर …

Read More »

बीएसएनएल सेवेचा मुरूडमध्ये बोजवारा

इंटरनेटअभावी पोस्टाचा कारभार ठप्प मुरूड : प्रतिनिधी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची मुरूडमधील सेवा वारंवार खंडित होत असून, त्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने ही सेवा दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे. 11 नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील सर्व कारभार ठप्प झाला आहे. तसेच शेकडो मोबाइल बंद …

Read More »