Breaking News

Ramprahar Team

वर्षाविहारासाठी पर्यटक लोणावळ्यात

लोणावळा : प्रतिनिधी वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता रविवारी (दि. 7) लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची …

Read More »

गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण

321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्‍या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …

Read More »

तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …

Read More »

कर्नाटक पेच; काँग्रेस-जेडीएस बैठका

भाजपचे वेट अ‍ॅण्ड वॉच बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची …

Read More »

दिव्य दृष्टीचा चष्मा

रस्त्यावर अनेकवेळा खूप गर्दी जमलेली असते. त्याठिकाणी काय झाले आहे हे पाहाण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गर्दीमुळे किवा उंचीमुळे आपल्याला ते पाहता येत नाही. त्यामुळे पुढे असलेला जे सांगेल तेच खरे असे आपल्याला समजावे लागते. गर्दीत ज्याला जसे दिसले त्याप्रमाणे तो सांगतो. त्यामुळे काहीवेळा आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या वर्णना सारखी अवस्था होते. …

Read More »

श्वानांनंतर आता माकडांचा उच्छाद

पोलादपुरातील स्थिती; नगर पंचायतीकडून उपाययोजनेची अपेक्षा पोलादपूर ः प्रतिनिधी पूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या पोलादपूरकरांना नंतरच्या काही काळात मोकाट कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत असे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रेशनधान्य घोटाळ्याचा एक टेम्पो पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या दारात उभा राहिल्यानंतर आतील तांदूळ गहू सडल्यामुळे तेथे माकडांचे कळपच्या कळप येऊन …

Read More »

अपंग शाळांमधील शिक्षकांना मिळणार रखडलेले वेतन

अलिबाग ः प्रतिनिधी  राज्यातील अपंग शाळांमधील हजारो शिक्षकांना अखेर तीन महिन्यांनंतर रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर केल्यानंतर शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन वेतन प्रक्रियेद्वारे केले जाते. मात्र, त्यात तीन …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील  मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर 2019मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 जागांकरिता आरक्षण काढण्यात आले आहे. नेरळमध्ये 10 आदिवासी वाड्या असून त्या वाड्या ज्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी तीन जागांपैकी एकही जागेवर आदिवासी समाजासाठी आरक्षण नाही. दरम्यान, यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा …

Read More »

‘मेंदडीत डेंग्यूची लागण नाही’

म्हसळा ः वार्ताहर तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील मेंदडीकोंड व परिसरातील काही रुग्णांना थंडी, ताप, सर्दी, उलटी, अंगदुखी होऊ लागल्याने तपासण्या केल्या असता रक्तातील फ्लेटलेटस् कमी आसल्याचे आढळले व रुग्ण डेंग्यूसदश्य रुग्ण आसल्याची भीती व्यक्त झाली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, येथे डेंग्यूची लागण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील …

Read More »

वरसे ग्रामपंचायत परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रोहे ः पतिनिधी रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत  पावसाळ्यात भुवनेश्वरमधील आदर्शनगर, गणेश नगर व वैभवनगरसह लगत असलेल्या नगरमध्ये नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी  येते या नगरमध्ये हे पाणी घुसत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी मोठ्या प्रमाणात येत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे पाणी मानवनिर्मित अडथळ्यामुळे म्हणजे बिल्डरांनी नैसर्गिक नाल्यावर …

Read More »