पनवेल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावकरांना अभिवादन केले. या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, पनवेल …
Read More »मेरिटाईम बोर्डाच्या मालमत्तेला मोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उरण : प्रतिनिधी मोरा-मुंबई जलमार्गावरील मोरा धक्क्यावर मोटारसायकली घेऊन जाण्यास बंदी असतानाही प्रवाशी बिनधास्त मोटारसायकली घेऊन जात आहेत. त्यावर बंदी घालण्यासाठी मोरा बंदराच्या प्रवेशद्वाराला मोरा पोलिसांनी बेडी लावून बंदराचे प्रवेशद्वार बंद केले आहे. सदरचे काम मेरिटाईम बोर्डचे असतानाही हे काम पोलिसांना करावे लागत असल्याने ते नियमाला धरून नसल्याने प्रवासी वर्गातून …
Read More »पॅराशूट अपघातप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; जामिनावर सुटका
मुरुड : प्रतिनिधी येथील समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना झालेल्या अपघातात शनिवारी वेदांत पवार (वय 15) याचा मृत्यू तर त्याचे वडील गणेश पवार (वय 40) गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणात मुरुड पोलिसांनी पॅराशूट चालक सागर प्रदीप चौलकर यांच्यासह मुश्ताक बशीर मोडक, दिनेश धर्मा वाघमारे व मारुफ अस्लम शेख यांच्यावर …
Read More »‘पत्रकारांवर हल्ले करणार्यांना कडक शासन करा’
महाड : प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ समजल्या जाणार्या पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मतमोजणी दिनी अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर झालेल्या मारहाणी विरोधात पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. महाड पत्रकार संघाच्या वतीने या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, या मागण्या करीत मंगळवारी (दि. 28) महाड …
Read More »पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के
पेण : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून त्यात पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के लागला आहे. तालुक्यातील 1805 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 1803 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधून 1579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कुलने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. या प्रशाळेचा कला, वाणिज्य आणि …
Read More »रायगड जिल्ह्यातील मुली ठरल्या ‘बारावी’त अव्वल
अलिबाग : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 80.05 टक्के मुले तर 90.63 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला 14 हजार 338 मुली बसल्या होत्या, त्यातील 12 हजार 994 मुली उत्तीर्ण झाल्या. 90.63 टक्के मुली …
Read More »‘ती’ वास्तू नानकांची नाही
लाहोर ः पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या ऐतिहासिक गुरूनानक महालाची काही उपद्रवी लोकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने सोमवारी प्रकाशित केले होते, तसेच या महालातील महागड्या खिडक्या आणि दरवाजे विकल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली होती, परंतु हा महाल शिखांशी संबंधित वास्तू असली तरी शीख समुदायाचे पवित्र स्थान नसून …
Read More »मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प
Mumbai : people walking in Railway Track second day central line local train Technical problem is continue at Kurla Station on Wednesday . Photo by BL SONI मुंबई ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (दि. 28) विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू …
Read More »विहिंपचे व्यंकटेश आबदेव यांचे निधन
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील कात्रज येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांची सोमवारी (दि. 27) रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पाच वाजता नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे …
Read More »अपघातग्रस्त कारने घेतला पेट; सहा जखमी
लातूर ः प्रतिनिधी जिल्ह्यातील लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper