Breaking News

Ramprahar Reporters

खारघरमध्ये स्कूल बसला आग

विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्‍या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना …

Read More »

प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022मध्ये संपत आहे,  मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात …

Read More »

नैसर्गिक आपत्तीबाधित गावांचे होणार पुनर्वसन

सर्वसमावेशक धोरण निश्चितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीत निर्माण होणार्‍या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास सोमवारी (दि. 11) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, भूस्खलन …

Read More »

‘लम्पी’वर स्वदेशी लस तयार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणार्‍या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन समारंभात बोलत …

Read More »

माथेरानची माहिती आता एका स्कॅनवर!

 नगर परिषदेकडून अ‍ॅप विकसित कर संकलनासह पर्यटनाला चालना कर्जत : बातमीदार माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. तसे होऊ नये आणि पर्यटकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे यासाठी माहिती देणारे अ‍ॅप …

Read More »

पनवेलकरांना घडणार लालबागचा राजाचे दर्शन

महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा गौरा गणेशोत्सव पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना लालबागचा राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी (दि. 13) विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 30वे वर्ष आहे. पनवेलमधील महात्मा …

Read More »

पनवेलमध्ये गणेश विसर्जनावेळी शॉक लागून 11 जण जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील कोळीवाडा विसर्जन घाटावर शुक्रवारी (दि. 10) रात्री लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना 11 जणांना विजेचा शॉक लागला. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य नेते तसेच पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी रुग्णालयात …

Read More »

राहुलबाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघालेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी हल्लाबोल केला आहे. राहुलबाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत, असे म्हणत गृहमंत्री शाहा यांनी टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा …

Read More »

भरपावसात गणरायाला निरोप..!

अलिबाग : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत लाडक्या गणपती बाप्पाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी वरुणराजाने हजेरी लावली होती. तरीही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव जल्लोषात झाला. 10 दिवस गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. …

Read More »

राज्यातील शेतकर्‍यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून खुशखबर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्‍यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकर्‍यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली …

Read More »