Breaking News

Ramprahar Reporters

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा पुन्हा अडकणार विवाहबंधनात

मुंबई ः प्रतिनिधीभारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, दोघांचेही पहिले लग्न झालेले असून, घटस्फोटानंतर ते विभक्त राहात आहेत.विष्णू विशाल हा तमिळ सिनेमाचा एक मोठा सुपरस्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीरयष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणार्‍या …

Read More »

कृष्णाने मोडला 24 वर्षांपूर्वीचा विक्रम

पुणे ः प्रतिनिधीभारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव …

Read More »

श्रेयस अय्यर वन डे मालिकेसह आयपीएललाही मुकण्याची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाने शानदार कामगिरी करीत विजयी सलामी दिली असली तरी या सामन्यात भारताला दोन धक्के बसले. भारतीय संघ फलंदाज करताना सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाली. त्यानंतर गोलंदाजी करताना एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना श्रेयस अय्यरही दुखापतग्रस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन वन …

Read More »

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी (दि. 24) झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. तेलंगणा सूर्यापेठ येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून …

Read More »

राज्यात काही शहरांमध्ये लॉकडाऊनचे संकेत

मुंबई ः प्रतिनिधीकोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (दि. 23) …

Read More »

रक्त-प्लाझ्मादान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 90 वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 23) पनवेलच्या खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रक्त व प्लाझ्मादान …

Read More »

नवनीत राणा आक्रमक

अरविंद सावंतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणार्‍या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.संसदेत सचिन वाझे प्रकरण …

Read More »

राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट

फडणवीसांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरेंनी पांघरूण घातल्याचाही आरोप मुंबई ः प्रतिनिधीपरमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केला. राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट कार्यरत होते. त्या संदर्भात फोन टॅपिंग करण्यात आले, मात्र सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर पांघरूण घातले, असा दावा फडणवीस …

Read More »

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर हे सोमवारी (दि. 22) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.महाराष्ट्रात सध्या राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे …

Read More »