Breaking News

Ramprahar Reporters

सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

30 वाहने एकमेकांवर आदळली मुंबई : प्रतिनिधीसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका …

Read More »

अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र

पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून …

Read More »

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे हात जोडो आंदोलन

नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच 6 सप्टेंबरच्या शांतता मोर्चात 34 जणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हात जोडो आंदोलन केले. गुन्हे मागे घ्या; अन्यथा आम्हाला अटक करा असा, पवित्रा या वेळी प्रकल्पग्रस्तांनी घेत …

Read More »

नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील …

Read More »

हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …

Read More »

सुधागडातील चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

पाली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला आणि या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार आपदग्रस्तांना मदत केल्याचा दावा करीत असले तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी व ठाकूर बांधव तीन महिने उलटून गेल्यानंतरदेखील नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात आदिवासी लोक भरडून निघाले आहेत. निसर्गाने …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी महाड : प्रतिनिधीमहाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड-19 रुग्णांसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून …

Read More »

महानगर गॅस लाइनचे काम शेतकर्‍यांनी रोखले

खालापूर : प्रतिनिधीजोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येऊ नये असे सांगत खालापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी महानगर गॅसचे काम रोखले आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाइन कर्जत व खालापूर तालुक्यातूनही जाते, मात्र आमच्या जमिनीचा मोबदला …

Read More »

खालापूर तहसील आवारात आदिवासी विभागाचे उत्तरकार्य

राज्य शासनाविरोधात अनोखे आंदोलन खोपोली : प्रतिनिधीखावटी योजना आदिवासी जगवायला की मारायला असा संतप्त सवाल करीत श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 29) खालापूर तहसील कार्यालय आवारात राज्य शासनाच्या आदिवासी विभागाचे उत्तरकार्य केले. कोरोना संसर्गात जनजीवन ढवळून गेले आहे. हातावर पोट असलेला आदिवासी समाजदेखील त्यातून सुटलेला नाही. राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 …

Read More »

विरोधक ना शेतकर्‍यांसोबत आहेत, ना जवानांसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्याला विरोध करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांना अधिकार देत असतानादेखील ही मंडळी विरोध करू लागली आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधक ना …

Read More »