Breaking News

Ramprahar Reporters

रत्नागिरी, पुणे विजेते

चिपळूण : प्रतिनिधीयजमान रत्नागिरीने रोमहर्षक लढतीत मुंबई शहरचा 31-28 असा पराभव करून 67व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच पुरुषांचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर महिलांमध्ये पुण्याने मुंबई शहरवर 22-20 असा निसटता विजय मिळवत सर्वाधिक 23व्या जेतेपदाला गवसणी घातली.पवन तलाव मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत सायली केरिपाळे, स्नेहल …

Read More »

निर्माल्य कलशाचे लोकार्पण

सर्वांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छता ही सेवा आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचा अंगिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ’गाढी नदी वाचवू या’ उपक्रमांतर्गत चिपळे येथे बसविण्यात आलेल्या …

Read More »

वुई सपोर्ट ‘सीएए’!

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी …

Read More »

शेतकर्‍यांचा विश्वासघात

अपुर्‍या कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका नागपूर : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणार होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

गव्हाण विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

अलिबागेत आज राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) अलिबाग येथे राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून तेलंगण करीमनगर येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला 10 किमी, 20 वर्षांखालील मुले …

Read More »

पनवेलच्या कुणाल पाटीलचे बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’यश

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये राहणारा व्ही. के. हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल पाटील याने नुकत्याच अकोला येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत सुयश प्राप्त केले आहे.कुणालने स्पर्धेत क्लब क्लास (वय 12 ते 13)मध्ये 44 किलो वजनी गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नागपूरच्या रचित सरपाटणे याचा पराभव …

Read More »

मीराबाई चानूला सुवर्णपदक

दोहा : वृत्तसंस्थामाजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने 194 किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या 24 वर्षीय मीराबाईने स्नॅच …

Read More »

भारत-विंडीज आज अंतिम लढत

कटक : वृत्तसंस्थाभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (दि. 22) तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्यात जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.भारत दौर्‍यावर आलेला विंडीज संघ ट्वेन्टी-20 मालिका हरला. विशेष म्हणजे त्या मालिकेतही अंतिम सामन्यापूर्वी …

Read More »

भिजलेल्या भातालादेखील हमीभावा द्या

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधीअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकणात शेतकर्‍यांचा भिजलेला भातदेखील राज्य शासनाने  प्रतिक्विंटल 1850 रुपये इतक्या  हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपचे कोकण प्रभारी व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे …

Read More »