कोरोनाचा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्ती ही काही वाळीत टाकण्याजोगी नसते. अशा व्यक्तीची काही चूक देखील नसते. परंतु अशा व्यक्तींना जवळपास वाळीत टाकण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत आढळून आल्या आहेत. तर कोरोनाविषयीच्या या सार्याभ्रामक समजुती तातडीने दूर करायला हव्यात. किंबहुना, या लढाईचे स्वरुपच ते आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या शत्रूशी लढणे अतिशय …
Read More »बेपर्वाईची किंमत
कोरोना विषाणूची साथ किती गंभीर आहे याबद्दल पुरेशी जागरुकता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अद्याप निर्माण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना कोरोनाच्या महासंकटाबद्दल फारशी माहिती नाही. मास्क लावणे, वारंवार हात धुणे अशा सावधगिरीच्या क्रिया अनेकांना चक्क विनोदी वाटतात. कडक निर्बंध लादून सरकार अतिरेक करीत असल्याची भावना काही अर्धशिक्षित मध्यमवर्गीयांमध्ये दिसून …
Read More »धैर्य राखून दक्षता हवी
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अर्थात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आदींचा पुरवठा तसेच इतर आवश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही आता बंद करण्यात आल्याने प्रवासावर मर्यादा येतील. त्याने काही प्रमाणात जनता भयभीतही होईल. पण त्याला आता इलाज नाही. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन आजही अनेकजण गांभीर्याने घेत …
Read More »कोरोना विषाणूची काळजी नको… सावध राहा!
लहान-लहान थेंबाद्वारे विषाणू पसरतात.श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करुन आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी, फ्लू आणि उजतखऊ-19 यासारख्या विषाणूंपासून वाचवतो. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या- जर आपल्या अस्वस्थत वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल …
Read More »जनतेचे अभिनंदन व आभार!
महाभयंकर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सुमारे 130 कोटी लोकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर यातून देशवासीयांचेच जीवन सुरक्षित होणार आहे. तरीही देशाच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब कटाक्षाने पाळून भारतीयांनी संपूर्ण जगाला नवा आदर्श घालून दिला आहे. चीनमधून पसरलेला …
Read More »जागतिक जल दिन
पाणीप्रश्न दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्त्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्यानिमित्ताने पाणीप्रश्नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणीप्रश्नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेने तो प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत यादृष्टीने दरवर्षी 22 मार्च हा दिवस …
Read More »बारामतीचे आणखी एक शरद पवार..!
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतील विधानभवनात 24 फेब्रुवारीपासून सुरू झाले आणि या मार्चमध्ये विधानभवनातील सुरक्षा रक्षक म्हणून सुमारे 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर शरद मानसिंग पवार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल… विधानभवनातील सुरक्षा रक्षक शरद पवार हे 30 वर्षांपूर्वी विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यामध्ये सामील झाले. मुंबई पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष पोलीस …
Read More »कोरोनाविरुद्ध लढा देऊ या!
कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. दुसर्या महायुद्धाचा विपरीत परिणाम जितक्या देशांवर झाला नव्हता त्याहून अधिक देश सध्या कोरोनानामक विषाणूमुळे विदारक परिस्थिती अनुभवत आहेत. चीनमधून पसरलेल्या या महामारीचा फैलाव वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. जगाने यापूर्वी अनेक संसर्गजन्य रोग, आजार अनुभवले आहेत. त्यात प्लेगचा …
Read More »युद्ध आमुचे सुरू
लोकांना घरातच बसवण्याची सक्ती काहीशी गैरसोयीची नक्कीच आहे. परंतु ही युद्धसदृश परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. युद्ध काळात जसे कडक निर्बंध लादले जातात. तशाच प्रकारच्या गांभीर्याने विषाणूविरुद्धच्या लढाईत देखील दोन हात करावे लागतील. सारा देश कोरोना विषाणूशी भीषण झुंज देत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आपल्या महाराष्ट्रातच आहेत हा दुर्दैवाचा …
Read More »जलप्रवास रामभरोसे
मुंबईहून अलिबागला रस्त्याने येण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. त्यामुळे अलिबागहून मुंबईला जाणारे तसेच मुंबईहून अलिबागला येणारे प्रवासी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते मांडवा अलिबाग हा समुद्रमार्ग जलवाहतुकीचा प्रवास पसंत करतात. यात वेळ वाचतो. परंतु हा प्रवास कसा रामभरोसे असतो हे 14 मार्चच्या घटनेने दाखवून दिले आहे. अजंठा कंपनीची बोट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper