Breaking News

संपादकीय

आरोग्यम धनसंपदा

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जो तो यंत्रवत काम करीत आहे. कामाचा प्रचंड रेटा आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे धावपळ होणे स्वाभाविकच आहे, पण कळत-नकळत मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या व्यस्त जीवनात स्वत:च्या …

Read More »

महाराजस्व अभियान पोलादपूर तालुक्यात उपयुक्त

रायगड जिल्हाधिकार्‍यांनी महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, त्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने 23 डिसेंबर 2019 रोजीच्या परिपत्रकान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावनिहाय चावडी वाचन, अदालत, नोंदी, सत्यपत्रिकाच्या नोंदी, गवंड, रस्ते, मुक्ती तसेच इतर प्रलंबित नोंदी अद्ययावत करण्यासाठी …

Read More »

उंच माझा झोका…

काही लंडन आय हा चक्री पाळणा गेली वीस वर्षे सुरू आहे. या चक्री पाळण्याच्या उभारणीसाठी 1999 साली ब्रिटिश सरकारची तब्बल 8 कोटी पौंड इतकी महाप्रचंड रक्कम खर्ची पडली होती याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना असायला हवे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीतून आकर्षक पर्यटन स्थळ उभे राहिलही परंतु त्या आधी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा नष्ट …

Read More »

चाय से किटली गरम

निवडणुकीत राबराब राबणार्‍या कार्यकर्त्यांनी एखादे वेळी स्तुतीसुमनांची उधळण करताना मर्यादा ओलांडली तर त्यावर कठोर कारवाई करणे नेत्यांना देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी कुण्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ग्रंथाबाबत असाच वाद उद्भवला. वास्तविक अशी पुस्तके आणि अन्य स्तुतीपर साहित्यसामग्री सदासर्वकाळ प्रसिद्ध होत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम …

Read More »

1984चा गौरवशाली शेतकरी लढा

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी 16 जानेवारी 1984 रोजी राज्य सरकारविरोधात जोरदार लढा द्यावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकरी जमिनीला 40 हजार रुपये भाव देण्यास नकार दिलाच, उलट सक्तीचे धोरण अवलंबून शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादन करण्यास सुरुवात केली. सरकारच्या सक्तीच्या धोरणाविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र …

Read More »

ज्येष्ठ नागरिक कायदा ठरतोय निरुपयोगी

लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील, मग पुढचा कालावधी म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटू लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिने घडतात. त्यांची वृद्धाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका …

Read More »

महागाईची चेटकीण

सरकारी प्रयत्नांमुळे काही प्रमाणात ग्राहकोपयोगी खाद्य जिन्नसांचे भाव काहिसे उतरले असले तरीही परिस्थिती आवाक्याच्या बाहेरचीच आहे. अन्न धान्या व खाद्य पदार्थांचे भाव लवकरात लवकरात लवकर अणखी खाली आणाणे नितांत गरजेचे असून केंद्र आणि राज्य  सरकारने या संदर्भात तातडीने पावले उचलायाला हवीत. या महागाईमुळे शहरी भागांमध्ये जीवनमान मेटकुटीला आलेले दिसत असताना …

Read More »

अभिव्यक्ती की सुरक्षितता?

प्रारंभीचे काही महिने काश्मीरमध्ये कडक निर्बंध होते. इंटरनेट सेवा, दूरध्वनी सेवा, टीव्ही प्रक्षेपण अशा अनेक नागरी सेवा खंडित करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालये, त्यांच्या परीक्षा, सरकारी आस्थापना यांचेही कामकाज विस्कळीतच होते. स्थानिक नागरिकांना या निर्बंधांचा बराच त्रास झाला व ते साहजिकच होते. परंतु या काळामध्ये बंदुकीची एकही गोळी सुटली नाही हे …

Read More »

पुरोगामी महाराष्ट्रात एसटीलाही अंधश्रद्धेचे ग्रहण

पुरोगामी विचारसरणीची परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यात जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देणारेच सरकार आणि प्रशासनच जेव्हा स्वत:च या अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटून जाते, तेव्हा मग जनतेने कोणाचा आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. एसटीच्या देवगड आगारात नव्याने रुजू झालेल्या शयन बसला काळी बाहुली लटकविण्याचा धक्कादायक प्रकार पाहिल्याने प्रशासन आणि सरकारच्या या वागण्याचा राग …

Read More »

युद्धाच्या उंबरठ्यावर

इराण आणि अमेरिका यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये तिसर्‍या महायुद्धाची बीजे काही युद्धतज्ज्ञांना दिसू लागली आहेत. त्यात तथ्य देखील आहे. कारण या युद्धाने उग्र स्वरुप धारण केल्यास अन्य देश त्यात आपोआप ओढले जातील व सारे जग त्या आगीत होरपळेल अशी चिंता जगातील नेते मंडळींना वाटू लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सुरू …

Read More »