भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद
आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा परवडणार्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड हा सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजने अंतर्गत …
Read More »सेतू प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना गणपती बाप्पा पावला!
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या दिवाळे, बेलापूर व सारसोळे गाव …
Read More »निर्बंध शिथिल झाल्याने दिलासा
मुंबई, अलिबाग : प्रतिनिधी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध 1 फेब्रुवारीपासून रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा …
Read More »दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
मुंबई ः प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे पोलिसांच्या बदल्या रद्द
परमबीरांनंतर कुंटेंचा खळबळजनक दावा मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, असा गौप्यस्फोट कुंटे यांनी केलाय. त्यांनी पोलीस बदल्यांबाबत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी)आपला जबाब नोंदवला आहे. परमबीर सिंग यांनी …
Read More »ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी (दि. 2) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. याबाबत त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी माहिती दिली. रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. हिंदीत चित्रपटांतही त्यांनी काम केले. काही जाहिरातीही केल्या. नायक आणि खलनायक अशा दोन्ही …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिवस साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बुधवारी (दि. 2) वनपस्ती शास्त्र विभाग ,नेचर क्लब आणि आयक्यूएससीतर्फे शाश्वत भविष्यासाठी ओलसर जमीन या विषयावर आभासी व्याख्यान आयेजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ए.एस.पी महाविद्यालय, देवरूख रत्नागिरी येथील वनस्पती शास्त्र …
Read More »केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपचे नेते गावोगाव पोहचविणार
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 2) देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »मुंबईत भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले
मुंबई : प्रतिनिधी ‘पेगॅसेस’वरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. या वेळी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले. केंद्र सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper