Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडातही नाइट कर्फ्यू

अलिबाग : पर्यटकांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल, रेस्टोरंट व रिसोर्ट्सवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या रविवारी जंजिरा …

Read More »

मागण्या मान्य झाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही!

रिलायन्स प्रकल्पग्रस्त तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्ते संतप्त नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू असताना सोमवारी दुपारी जगदिश वारगुडे या प्रकल्पग्रस्त तरुणाचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलनकर्ते संतप्त झाले असून, आमच्या मागण्या कंपनी जोपर्यंत ऐकून घेत मान्य करीत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन …

Read More »

खालापुरात दुय्यम निबंधक लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीदस्तऐवज नोंदणीकामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र शिवराम गुप्ते (वय 53, सध्या रा. कर्जत, मूळ  नाशिक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.बांधकाम व्यावसायिक किशोर बाफना यांनी खालापूर तालुक्यातील खरिवली व नंदनपाडा भागात …

Read More »

‘विवेकशील बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा’

अलिबाग : प्रतिनिधी – ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील तसे नवे ज्ञान प्राप्त होईल, अनेक गोष्टींचं आकलनसुद्धा होईल. विज्ञान हे  अंतिम सत्याचा कधीही दावा करत नाही. जीवनातील श्रद्धा तपासल्या पाहिजेत. माणूस विवेकशील बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाची भूमिका बजावतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तिशः आणि सार्वजनिक जीवनात आचरणात आणला पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय …

Read More »

पेणमध्ये माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात

पेण : प्रतिनिधी – पर्यावरण व स्वच्छता संतुलनासाठी पेण नगर  परिषदेमार्फत ’माझी वसुंधरा’ या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात साई मंदिर तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली त्याला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. जैविक अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शाश्वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबण्याचा मार्ग आहे. म्हणून माझी वसुधरा अभियान …

Read More »

रस्त्यासाठी शिवसेनेवरच आंदोलनाची वेळ

रेवदंडा पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने बांधकाम खाते अखेर राजी रेवदंडा : प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, यासाठी राज्यातील सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवरच रास्ता रोको करण्याची वेळ आली होती. दरम्यान, रेवदंड्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी रस्ता दुरूस्ती व डांबरीकरणाचे आश्वासन …

Read More »

माथेरान घाटात कारला अपघात; दोघे जखमी

कर्जत : बातमीदार – नेरळ- माथेरान घाटात चालकाचा ताबा सुटल्याने फियाट कार झाडावर आदळली. या अपघातात वाहन चालक हरीचंद किसनचंद देवनानी (नेरूळ) आणि त्याचा मित्र हरिराम गुरुदासमन पंजावणी (उल्हासनगर) हे दोघे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हरीचंद देवनानी आणि हरिराम पंजावणी हे दोघे  फियाट …

Read More »

तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्ते संतप्त

…तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत : अ‍ॅड. बी. जी. कोळसे-पाटील नागोठणे : प्रतिनिधी – मृताच्या कुटुंबियांची परवानगी घेऊनच पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठी पनवेलला स्वतः घेऊन जात आहे. आमच्या लेखी मागण्या रास्त असून रिलायन्स कंपनी जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे …

Read More »

अलिबागकरांनी अनुभवली शनी आणि गुरूची युती

800 वर्षांनंतरचा दुर्मीळ योग अलिबाग ः प्रतिनिधीसूर्यमालेतील गुरू आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आले असून, तब्बल 800 वर्षांनी असा योग आला आहे. दोन ग्रहांची दुर्मीळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.खगोलशास्त्रज्ञ एस. …

Read More »

‘रिलायन्स’विरोधी आंदोलनातील प्रकल्पग्रस्त तरुणाचा अकाली मृत्यू

नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्स कंपनीसमोर 27 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणाचा सोमवारी (दि. 21) अकाली मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.जगदिश किसन वारगुडे (वय 29) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो पिगोंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सारिका वारगुडे यांचा पुत्र होता. आंदोलनात सहभागी झालेल्या …

Read More »