Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालीकरांची एकजूट; नदी, जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी श्रमदान

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल व बाजूचा परिसर गाळाने भरला होता. ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान मोहीम राबवून जॅकवेल व पाण्याच्या मार्गावर साचलेला गाळ काढला. त्यामुळे पालीमध्ये वेळोवेळी भासणारी पाणीटंचाई सध्या तरी दूर झाली आहे. अष्टविनयकापैकी एक स्थान असलेल्या पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला …

Read More »

नागोठण्यातील आंदोलनाला पनवेल, उरणच्या संघटनांचा पाठिंबा

नागोठणे : प्रतिनिधी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रारंभ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (दि. 1) पाचव्या दिवशी सुरूच आहे. मात्र आमदार रविशेठ पाटील यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री तसेच एकही लोकप्रतिनिधी आणि रिलायन्सच्या अधिकार्‍यांसह कोणताही सरकारी अधिकारी याठिकाणी पोहोचलेला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा उत्साह दररोज …

Read More »

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला …

Read More »

मराठा समाजाची पेणमध्ये निदर्शने

राज्य सरकारच्या कारभाराविरोधात संतापमहावितरण भरतीमध्ये सामावून घेण्याची मागणी पेण : प्रतिनिधीआरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मंगळवारी (दि. 1) मराठा समाज बांधवांनी पेण महावितरण कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. महावितरणमध्ये मराठा तरुणांची भरती करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.एमएसईडीसीएल अंतर्गत उपकेंद्र …

Read More »

महामार्गावर तीन अपघातांत तिघे जखमी; वाहतूक ठप्प

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी (दि. 30) सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे दूध घेऊन जाणार्‍या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो …

Read More »

आंदोलनकर्त्यांना वाढता पाठिंबा; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाचा चौथा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, निवृत्त कामगार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगारांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. पोलीस वगळता एकही सरकारी अधिकारी तसेच रिलायन्सचा वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत येथे पोहचला नसला तरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे विविध गावांमधून त्यांना वाढता …

Read More »

आधी पुनर्वसन, मग भूसंपादन करा!; चौक येथील रेल्वेमार्गबाधित प्रशासनाविरोधात आक्रमक

खालापूर : प्रतिनिधी कर्जत-पनवेल या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोबदला ठरलेला नसतानाही चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्याचा चंग कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने बांधला आहे, मात्र त्यास या वस्तीमधील रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला आमच्या घरांचा मोबदला व पर्यायी जागा द्या, तोपर्यंत घराच्या एकाही विटेला …

Read More »

खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार; आरोपी फरार

खालापूर : खालापूर तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीत राहणार्‍या एका 13 वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खालापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांची पथके या नराधमाचा शोध घेत आहेत.कुंभिवली आदिवासी वाडीतील अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी पाताळगंगा नदीजवळ रोजी रुबी कंपनीच्या …

Read More »

रायगडातील देवस्थानच्या जत्रा रद्द; जत्रोत्सवातील उलाढालीला कोरोनाची बाधा

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी संपली की कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबरपर्यंत टाळेबंदीत लोकांचे आर्थिक गणित कोलमडले.गणेशोत्सवापासून हळूहळू टाळेबंदीला …

Read More »

रोह्यात ओबीसी संघर्ष समितीची सभा; सर्व घटकांना सोबत घेऊन लढा देण्याचा निर्धार

रोहे : प्रतिनिधी राज्यघटनेच्या मूलभूत हक्काद्वारे आम्हाला आरक्षण मिळाले आहे, परंतु प्रशासनातील शुक्राचार्य ओबीसींना आरक्षण व मागण्या मान्य होऊ देत नाही. आमचा ओबीसी समाज उत्पादन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा समाज श्रीमंत असायला पाहिजे, पण असे चित्र दिसत नाही. उलट घरीच बसणारा समाज श्रीमंत आहे. यामुळे यापुढे ओबीसींमधील सगळ्यांना सोबत …

Read More »