भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल मेलबर्न : वृत्तसंस्थामहिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींचा मॅरेथॉनमध्ये सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तडी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडीजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी दोन विद्यार्थिनींनी आपली चुणूक दाखविली.नवी मुंबईतील हजारो विद्यार्थिनी, तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला …
Read More »‘कोरोना’मुळे आयपीएल लांबणीवर पडणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाचीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘कोरोना’मुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे, परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा सलग दुसर्या वर्षी ‘डबल धमाका’
जयपूर : वृत्तसंस्थाराजस्थान राज्य कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने दोन्ही विभागांत विजेतेपद पटकावत सलग दुसर्यांदा डबल धमाका केला. रेल्वेच्या महिलांनी 33 वेळा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. त्यातील 31 वर्षे सलग विजेतेपद मिळवत त्यांनी एक वेगळा विक्रम केला, तर रेल्वेच्या …
Read More »वसीम जाफरचा क्रिकेटला अलविदा
मुंबई : प्रतिनिधीरन मशिन अशी ओळख असणार्या वसीम जाफरने शनिवारी (दि. 7) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम जाफरच्या नावावर आहे. तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.तंत्रशुद्ध सलामीवीर अशी वसीम जाफरची ओळख होती. मुंबईकडून रणजी करंडक खेळताना …
Read More »महिला टी-20 वर्ल्डकप फायनलला पाऊस पडल्यास…
मेलबर्न : वृत्तसंस्था महिला टी-20 वर्ल्डकपचा विजेता होणार याची सर्वांना आता उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी (दि. 8) फायनल रंगणार आहे, पण उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पाऊस पडला, तर कोण विजेता होणार, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. जर विश्वविजेता ठरवायचा असेल तर किमान …
Read More »एका सामन्यात दोघे सामनावीर
केपटाऊन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचाविरुद्धची तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या सामन्यात विजय मिळवत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. हा सामना झाल्यानंतर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे; तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याचबरोबर एकाच संघातील दोन …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राकडून हिमाचल प्रदेशचा धुव्वा
जयपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या पुरुषांनी शेवटच्या साखळी सामन्यात हिमाचल प्रदेशचा 46-20 असा धुव्वा उडवीत जोरदार आगेकूच केली. जयपूर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलातील मॅटवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत हा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या पाच मिनिटांतच हिमाचलवर लोण देत आपला इरादा स्पष्ट केला. 18व्या मिनिटाला दुसरा …
Read More »महिला वर्ल्डकप : भारत अंतिम फेरीत; पावसामुळे इंग्लंडविरुद्धची सेमीफायनल रद्द
सिडनी : वृत्तसंस्था महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. गट ‘अ’मध्ये असलेल्या भारतीय संघाने आठ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते, तर गट ‘ब‘मध्ये इंग्लंडचा संघ सहा गुणांसह दुसर्या स्थानावर …
Read More »रणजी करंडक : सौराष्ट्र अंतिम फेरीत
राजकोट : वृत्तसंस्था जयदेव उनाडकच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत गुजरातवर 92 धावांनी मात करीत सौराष्ट्राने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अंतिम फेरीत सौराष्ट्राची गाठ पश्चिम बंगालशी पडणार आहे. सौराष्ट्राने पहिल्या डावात 304 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात 252 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper