Breaking News

Ramprahar News Team

राजनाला कालवा परिसरातील शेतकर्‍यांना भातशेतीत अडथळे; दुरुस्ती रखडली; शेतकरी हवालदिल

कर्जत : बातमीदार उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी भाताची शेती करण्यासाठी सोडले जाते. या वर्षी पावसाळ्यात कालव्यांना पडलेल्या खांडींची दुरुस्ती वेळेवर झाली नाही, त्यामुळे दुबार शेतीसाठी पाणी येणार नाही. 35 गावांतील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या राजनाला कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते, मात्र पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने मशिनरी दिली …

Read More »

म्हसळ्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

म्हसळा : प्रतिनिधी शासनस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम गावाची, तालुक्याची संस्कृती विकसित करीत असते. येथील नागरिक निर्सगाच्या सान्निध्यात आहेत, त्यांनी तो निसर्ग वाचायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन म्हसळ्याचे तहसीलदार समीर घारे यांनी येथे केले. महसूल विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून म्हसळा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये नुकताच …

Read More »

अडकलेल्या ट्रेकर्सची आठ तासांनंतर सुटका; यशवंती हायकर्स, निसर्ग मित्र मदतीला

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पेणमधील तिघा जणांच्या नवीन वाट शोधण्याचे साहस चांगलेच अंगलट आले. तब्बल आठ तास दरीच्या मध्यावर अडकल्यानंतर मदतीला आलेल्या खोपोलीतील यशवंती हायकर्स, पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी, तसेच स्थानिकांनी तिघा पर्यटकांची सुटका केली. रविवारी पेण येथून दहा तरुण वडगाव (ता. खालापूर) येथील माणिकगडावर …

Read More »

महाडची शान डॉ. हिम्मतराव बावस्कर

स्वराज्याची राजधानी महाडमध्ये! स्वराज्य जननी जिजाऊंची समाधी महाडमध्ये! छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाडमध्ये! डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समता चळवळीचे चवदारतळे महाडमध्ये! दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ महाडमध्ये! सम्राट अशोक कालीन बौद्धलेणी महाडमध्ये! सी. डी. देशमुखांचे जन्मगाव महाडमध्ये! आणि आता पद्मश्री पुरस्कार महाडमध्ये!महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीत, अनेक विचारवंत जन्माला आले. रक्ताचा एकही …

Read More »

चौकच्या नेताजी पालकर शाळेत हुतात्मा दिन

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा संचलित चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हुतात्मा दिन झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा …

Read More »

करंजाडेत हळदीकुंकू समारंभ

करंजाडे : रामप्रहर वृत्त करंजाडे येथील सेक्टर 3मधील दुधे विटेवरी कॉम्पेक्समध्ये शनिवारी (दि. 29) हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या वेळी सोसायटीमधील सर्वधर्मीय 60 महिलांनी मराठमोळी पारंपरिक वेषभूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांचे स्तवन आणि गुरूवंदनेने झाली. मकरसंक्रांत कशी व का साजरा केली जाते, तिळाचे लाडू का खाल्ले जातात, तसेच काळी …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा : सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या भेटीमुळे बालकलाकार झाले आनंदित!

पनवेल : प्रतिनिधी नागबादेवी कलामंच, वसई यांच्या एकांकिकेतील समर्थ, वरद आणि छोटी द्रोणा या बालकलाकारांची भेट सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांचे जवळ झाली असता त्यांना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासारखा होता. मौनांतर-नागबादेवी कलामंच, वसई यांनी सादर केलेल्या एकांकिकेतील हे तीन बाल कलाकार …

Read More »

‘मविआ’च्या घटक पक्षांत कुरबुरी; अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून टोलेबाजी

अहमदनगर : प्रतिनिधी मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत …

Read More »

गुळसुंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी गुळसुंदे येथील स्वामी विवेकानंद तुंगारतन विद्यालयातील सन 1991-92 या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात करण्यात आला. रसायनी परिसरातील हे मित्रमंडळी तब्बल 30 वर्षांनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. आपल्या वर्गमित्रांना एकत्रित आणण्याचे काम देवळोली येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी …

Read More »

नवी मुंबईत भित्तिचित्रे रंगवून जनजागृती; स्वच्छतेसाठी कलाकृतीतून आवाहन

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भित्तिचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके केले जात आहे. त्यामुळे शहराला या चित्रांमुळे जिवंतपणा आला आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस, व रहेजा या नामवंत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांकडून ही भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात …

Read More »