Breaking News

Ramprahar News Team

सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये मोर्चा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात नगर परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या तथाकथित प्रकरणावरून दाखल तांत्रिक गुन्ह्यात गटनेते अनिरुद्ध पाटील यांना अडकविण्याचे कट-कारस्थान तसेच पोलीस प्रशासन यंत्रणेने रात्रीच्या सुमारास आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी अनिरुद्ध पाटील यांना पकडण्यासाठी घेतलेली झाडाझडती या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पेणमध्ये गुरुवारी (दि. 29) निषेध मोर्चा व …

Read More »

रुग्णाचा मृत्यू; नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, तर डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी …

Read More »

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर!; स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानले जाते. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामन्याला रंग चढत असतो, पण कोरोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास चार ते पाच महिने क्रिकेट बंद …

Read More »

मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक; महाविकास आघाडी सरकारला 1 नोव्हेंबरचा अल्टीमेटम; अन्यथा टाळी फोडण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने बुधवारी (दि. 28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय …

Read More »

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे तसेच याची …

Read More »

राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

दरभंगा : वृत्तसंस्था बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला बुधवारी (दि. 28) सुरुवात झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला; सत्ताधारी सर्व उमेदवारांची सभापतिपदांवर निवड; पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांची निवडणूक बुधवारी

पनवेल : प्रतिनिधी (दि. 28) ऑनलाइन पद्धतीने होऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे. स्थायी समिती सभापतिपदी संतोष शेट्टी आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदी सत्ताधारी उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती, महिला व …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांचे 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन

पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीत अनेक एसटी कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता कामावर येऊन प्रवासी वाहतूक सुरळीतपणे हाताळली, मात्र त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. या एसटी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता, दिवाळी उचल, दिवाळी भेट आणि थकीत वेतन येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही, तर 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी आपापल्या घरासमोर …

Read More »

सरसकट नुकसानभरपाई द्या; सम्यक क्रांती विचार मंचचे तहसीलदारांना निवेदन

पाली : प्रतिनिधी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सम्यक क्रांती विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 27) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले. आठवडाभर कोसळलेल्या …

Read More »

शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी -भाजप नेत्या शर्मिला सत्वे

माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड …

Read More »