Ramprahar News Team

न्हावे गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

स्वखर्चातून केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खर्चातून 40 लाख रुपयांचा निधी वापरून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी …

Read More »

पूनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याची गरज

महाड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व दरडग्रस्तांना तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचे पुनर्वसनकामी तब्बल 48 सरकारी परिपत्रकांमध्ये बदल केल्याने अभ्यासपूर्ण प्रयत्न यशस्वी झाले. याचे कौतुक दरडग्रस्तांना घरकुलांचा ताबा देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी यशस्वीरित्या समाजसेवी संस्थांच्या मदतीने राबविलेल्या ’देशास आदर्शवत् पुनर्वसनाचा महाड पॅटर्न’असे संबोधिले, मात्र पोलादपूर …

Read More »

रोह्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत (एसीबी) विभागाने बुधवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.. विशेष म्हणजे या आधीही या तलाठ्यावर महाड येथे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. …

Read More »

रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी

पनवेल महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय कामे सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या चारही प्रभागामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी चारही प्रभागातील रस्त्याचा आढावा घेऊन तातडीने यावरती उपाययोजना करण्याबाबत संबधित विभागास सूचना दिल्या आहेत. …

Read More »

आदिवासींच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेश बालदी दक्ष

वाड्यांची पाहणी करून जाणून घेतल्या समस्या मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार महेश बालदी सातत्याने घटनास्थळी असून आवश्यक ते सहकार्य करीत आहेत. दरम्यान, इतर आदिवासीवाड्यांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी आदिवासी समाजाचे नेते व यवतमाळमधील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यासमवेत …

Read More »

उल्हास नदी संवर्धन कर्जतकरांसाठी वरदान

कर्जत शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीकडे बघून मन प्रसन्न होत असते, परंतु पावसाळा आला की नदीच्या काठावर राहणार्‍या रहिवाशांच्या पोटात दररोज रात्री गोळा येतो कारण अतिवृष्टीमुळे ही नदी उलटून तिचे पाणी कधीही कर्जत शहरात घुसत असे. त्यामुळे नदीच्या किनार्‍यावर असलेल्या रहिवाशांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे. यावर …

Read More »

अतिवृष्टीने हाहाकार

गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली आहे. सततच्या पावसाने चांदा ते बांदा हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, तर राज्यात विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. जून महिन्यात ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्‍या लोकांवर …

Read More »

ई-रिक्षाचे घोडे अडलेय कुठे?

माथेरानकरांचा सवाल; सर्व स्तरांतून सेवा सुरू करण्याची मागणी नेरळ ः प्रतिनिधी माथेरान पायलट प्रकल्पानंतर माथेरानमधील ई-रिक्षांची सेवा बंद आहे. याबाबत संनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, यात ही सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या सदस्यांनीही रिक्षांची सेवा बंद करायला आम्ही कुठे …

Read More »

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची शोधमोहीम थांबवली; 57 जण बेपत्ता

खालापूर, चौक, खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी इर्शाळवाडीत दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी …

Read More »

इर्शाळवाडी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि. 22)पासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबिर लावण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत …

Read More »