Breaking News

Ramprahar Team

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वत्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत पनवेल तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहारात शनिवारी (दि. 24) करण्यात आला. संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, …

Read More »

महिलेचे फेसबुक अकाऊंट हॅक

पैसे न दिल्यास बदनामीची धमकी पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील आदई गावातील एका इमारतीत राहणार्‍या फिर्यादीच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यावरील फोटो अश्लिल फोटो बनवून अकाऊंटवरील क्रमांकावर तो फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून हॅकरने खंडणीची मागणी केली. म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा …

Read More »

पनवेलच्या फार्महाऊस चालकांना नोटीसा

नियमांचे पालन करण्याच्या पोलिसांकडून सूचना पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी नुकतीच फार्महाऊस चालक आणि मालक यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दौंडकर यांनी फार्महाऊस चालकांना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, …

Read More »

पनवेलमधून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, सीकेटी, आरटीसीसीएस महाविद्यालयांचा पुढकार पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टी व दरड कोसळल्याने महाडवासियांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा अस्मानी संकटसमयी, पूरग्रस्त बांधवांना माणुसकीची हाक देत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय आणि …

Read More »

न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा ठाकूर यांची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विभागीय अध्यक्ष विजय घरत, जयवंत देशमुख, माजी सरपंच चिंतामण भोईर, माजी उपसरपंच सागर ठाकूर, उलवा उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य हरेश्वर म्हात्रे, राम मोकल, मीनाक्षी …

Read More »

महाड, पोलादपूरातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण

दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार अहवाल अलिबाग : प्रतिनिधी महाड, पोलादपूरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या यानंतर या सर्व गावांची भुवैज्ञानिकांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ते आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये, हिरकणीवाडी येथे तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर सुनातरवाडी, …

Read More »

काशीद पूल दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळाली शासकीय आर्थिक मदत

मुरूड : प्रतिनिधी काशीद पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार गमन गावित यांनी प्रदान केला. अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील काशीद येथील छोटा पूल 11 जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत विजय चव्हाण (रा. एकदरा) यांचा मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण …

Read More »

महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाली : रामप्रहर वृत्तसेवा महापुराने महाडमध्ये आतोनात नुकसान केले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अतिवृष्टीमुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांना पूर येऊन, पुराचे पाणी महाड शहर व परिसरातील घरे आणि दुकानांमध्ये घुसले होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर …

Read More »

कर्जतच्या आसल आदिवासीवाडीत घर खचले

कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील आसल आदिवासीवाडीमधील भिमीबाई सांबरी यांचे घर खचले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणे धोकादायक झाले असून शासनाने तत्काळ त्या महिलेला मदत देण्याची मागणी होत आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आसलवाडीमध्ये भिमीबाई सांबरी यांचे कुडामेडीचे घर आहे. मुसळधार पावसामुळे या महिलेचे घर पूर्ण खचले …

Read More »

गाडली गेली घरे, उद्ध्वस्त झाले संसार!

 महाडमध्ये पुरात तीन, तर दरडीखाली 84 मृत्यू ;  हजारो कोटींचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयात तळीये गाव नकाशावरूनच गायब झाले, तर महाड शहरासह सुमारे 103 गावांना या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता …

Read More »