Breaking News

Ramprahar Team

शिक्षणाचा खेळखंडोबा

गेले जवळपास दीड वर्ष देशात शाळा बंद आहेत. अनेक भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. निव्वळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनावरील महासाथीचे परिणाम दूर करण्याकरिता शाळा सुरू व्हायला हव्यात. अर्थात इतक्या सखोल विचाराची अपेक्षा गोंधळयुक्त कारभार करणार्‍या आघाडी सरकारकडून आपण करू शकतो का? देशात कोरोना अवतरल्यापासून …

Read More »

वरातीमागून घोडे नाचवण्याचा फायदा नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळालं असून अजूनही पुनर्वसन असो किंवा मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणताही दीर्घकालीन निर्णय घेण्यात आला नाही. लोकांसाठी  पुनर्वसनाच्या योजना अनेक आहेत प्रश्न केवळ तत्काळ अमलबाजावणीचा आहे. पैशांची कमी नाही, योजनांची कमी, नाही केवळ राज्य …

Read More »

उरणमधील आदिवासींना मदतीचा हात

उरण : वार्ताहर शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजपचा पुढाकार

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात मदत रवाना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 27) जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीच्या साहित्याची वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाली. अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर येऊन …

Read More »

कळवळ्याचा काँग्रेसी कावा

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चक्क ट्रॅक्टर चालवत संसद भवनाकडे कूच केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात त्यांनी अभिनव आंदोलन छेडले असा त्यांचा दावा आहे. ट्रॅक्टरवरून संसदेत येण्यामध्ये अभिनव असे काय आहे हे काँग्रेसजनच जाणोत. शेतकर्‍यांबद्दल प्रामाणिक कळवळा असता, तर गांधी यांनी सध्या सुरू …

Read More »

उरण तालुक्यातील 715 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले असून तालुक्यातील एकूण 715 घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामधील सर्वाधिक चिरनेर गावाला पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने उरणला झोडपले होते. या मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी …

Read More »

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वत्त भारतीय बौध्द महासभा, जिल्हा रायगड अंतर्गत तालुका पनवेलच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ, कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी पूजनीय भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे …

Read More »

धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे खांब बदलले

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त धोकादायक झालेले ट्रान्सफॉर्मरचे खांब माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून त्वरित बदलण्यात आले. पयोनियर विभाग संघमित्रा सोसायटीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे खांब कुचकामी झाले होते आणि ते कोणत्याही क्षणी पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब कार्यक्षम …

Read More »

अनेक स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा महापूर

कोटगाव ग्रामस्थ मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण : वार्ताहर   येथील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने सोमवार (दि. 26) जुलै रोजी महाड येथील तहसीलदार सुरेश कासिंद यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू स्वाधीन केल्या. महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब …

Read More »

पागोळ्याच्या पाण्याने धुतली घरे

कर्जतमध्ये पुरानंतरही पाऊस आला मदतीला कर्जत : प्रतिनिधी बुधवारी मध्यरात्रीनंतरच्या पावसाने उल्हास नदी उलटून कर्जत शहर, तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे घरातील धान्यासह बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरात चिखल झाला. तो धुऊन काढण्यासाठी पाण्याची गरज होती.  गुरुवारी पाघोळ्यांचे पाणी घेऊन नागरिक घरे स्वच्छ करतानाचे …

Read More »