लखनऊ : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसर्या फेरीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 11) कासगंज येथे प्रचारासाठी आले होते. या वेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा केला तसेच जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, जनतेला गुंडराज नको आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला. …
Read More »राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात आले. या सोहळ्याला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या संविधानानुसार आम्ही भारताचे लोक हा देशाच्या सार्वभौमत्वाचा …
Read More »माथेरानची मिनीट्रेन लवकरच रूळावर
माथेरान : प्रतिनिधी नेरळ ते माथेरानदरम्यानच्या मिनीट्रेनचा रेल्वेमार्ग अतिवृष्टीत वाहून गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेकडून या मार्गावर आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असून पर्यटकांचे खास आकर्षण असलेली मिनीट्रेन लवकरच रूळावर येणार आहे. सन 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणात …
Read More »एसटी संपाचा तिढा सुटेना!
अहवाल सादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला ठेवली आहे. एसटी संपासंदर्भात उच्चस्तरीय समितीचा अहवाल अद्याप तयार नसून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ न्यायालयाने दिली आहे. …
Read More »पुण्यात त्याच पायर्यांवर किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार
पुणे : प्रतिनिधी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे शुक्रवारी (दि. 11) पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले तसेच पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या 5 फेब्रुवारीला आधी शिवाजीनगर …
Read More »वाईन विक्री निर्णयाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका
मुंबई : प्रतिनिधी सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी …
Read More »मंत्री बच्चू कडूंना दणका!
निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने कारावास अमरावती : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या बच्चू कडू यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील स्वत:च्या मालकीच्या सुमारे …
Read More »कर्नाळा बँक प्रकरणात पुन्हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’, या धर्तीवर ‘आमच्याच प्रयत्नाने हे …
Read More »‘कारमधील सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ’थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशालादेखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, गाडीच्या …
Read More »रायगडच्या पालकमंत्र्यांना हटविण्याची आमदार भरत गोगावलेंची मागणी
माणगाव : प्रतिनिधी राज्यात असणारी महाविकास आघाडी सरकारची रायगडात मात्र कायम बिघाडी दिसत असून आता तर रायगडातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दाखवित आरोप केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री हटविण्याची मागणी शिवसेनेचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper