Breaking News

Pravin Gaikar

पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत

कर्जत : बातमीदार – पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काही दिवस उलटताच वरुणराजाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात पावसाची आतापर्यंत सरासरी केवळ 30 टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात चिंतेत आहे.  पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा मुसळधार पावसाचा असतो. या वेळी नदी-नाले ओसंडून वाहून पूरही …

Read More »

पनवेल तालुक्यात 158 नवे पॉझिटिव्ह

चार जणांचा मृत्यू; 122 रुग्ण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाचे 158 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

व्यापक सायबर प्रशिक्षण हवे

राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मंगळवारपासून डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील दहा शहरांतील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा फैलाव व पाठोपाठचे लॉकडाऊन यामुळे बदललेल्या जीवनशैलीत सर्वसामान्यांच्याही ऑनलाइन व्यवहार व संपर्कात कमालीची वाढ झाली …

Read More »

उरणचे रानसई धरण वाहू लागले

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. पाऊस आणि डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्‍या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहत असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरजे यांनी दिली. उरण तालुक्यातील 52 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागाला रानसई धरणातून …

Read More »

नवीन पनवेलच्या भुयारी मार्गात साचतेय पाणी

अपघाताला निमंत्रण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गाच्या कामात असलेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यामध्ये पाणी साचत असून, या साचलेल्या  पाण्यातून वाहनचालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असताना रेल्वे …

Read More »

कोरोनाग्रस्तांसाठी भाजप सरसावला

आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून नवी मुंबई पालिकेला तीन रुग्णवाहिका सुपूर्द नवी मुंबई : बातमीदार – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून तीन सुसज्ज अशा …

Read More »

मासळीची आवक घटली

खवय्ये नाराज; मच्छीमारांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात पावसाळी हंगाम सुरू असल्याने व शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारी करण्यास प्रतिबंध असल्याने मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक घटली आहे. यांत्रिकी बोटींना समुद्रात जाण्यास मज्जाव असल्याने सध्या मुरूड समुद्र किनार्‍यावर पेर्‍याने पकडण्यात आलेली मासळी तसेच समुद्राच्या …

Read More »

काकडी विक्रीला लॉकडाऊनचा फटका

शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्‍यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्‍यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक  उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा …

Read More »

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या  रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये …

Read More »

कर्जतमध्ये चार ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार असून, त्यातील एका ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण …

Read More »