Breaking News

Pravin Gaikar

गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये शिरले पुराचे पाणी

जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारागिरांचे नुकसान पेण : अनिस मनियार  – गेल्या चार-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, कळवे येथील गणेशमूर्ती कारखाने व घरांमध्ये पाणी शिरले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पेण तालुक्यातील जोहे तलाठी सजामधील तांबडशेत, जोहे, कळवे या गावांत कच्च्या गणेशमूर्तीचे …

Read More »

जीओ केबलचे काम अर्धवट; नागरिकांना त्रास

सुकापूर ः रामप्रहर वृत्त  – सुकापूरमध्ये जीओच्या लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहनचालक, पादचार्‍यांना त्रास होत आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जीओची केबल टाकण्याचे …

Read More »

डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त  – पनवेल, वाशी, बेलापूर, तसेच नवी मुंबईतील इतर शहरांच्या जोडीने उलवे नोड परिसर देखील विकसित होत आहे. यापूर्वी उलवेच्या नागरिकांना सर्वच सुविधांसाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती, परंतु झपाट्याने होणार्‍या विकासामुळे उलव्यात आता अत्याधुनिक सोयीसुविधा येत आहेत. या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत रामशेठ ठाकूर …

Read More »

सेक्टर 13मधील बंद पंप सुरू

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची तत्परता नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त  – नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये शनिवारी (दि. 27) पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी सिडकोचे चारही पंप बंद अवस्थेत होते. प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे तेथे गेल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

मरीन जोसेफच्या यशाची गाथा

भारतीय प्रशासनातील सेवेतून खूप मोठे काम करता येते. प्रशासकीय सेवेतून आपल्याला समाजाची सेवा करता येते, उत्तम जीवन जगता येईल, असा पगार व सुविधा मिळतात, मान-सन्मान आणि प्रसिध्दी आपोआप येते. शिवाय निवृत्तीनंतरही भविष्याची चिंता उरत नाही. हे सारे तर आहेच शिवाय खूप काही वेगळे आणि मोठे काम करता येऊ शकते. अनेक …

Read More »

फक्त तारीख बदलली…परिस्थिती तीच

26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी होऊन माथेरानमध्ये निसर्गाचे व येथील लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती 14 वर्षांनंतर होते की काय अशी भीती येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली होती.14 वर्षांनंतर पुन्हा 2019च्या 26 जुलैला अतिवृष्टी सुरू झाली व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. जसजसा पाऊस वाढत होता तसतशा जुन्या आठवणी …

Read More »

जलसाक्षरतेची गरज

गेल्या वर्षी नीती आयोगाच्या अहवालानुसार 600 दशलक्षपेक्षा जादा लोक उच्च टोकाच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे गेले असून दिल्ली, हैदराबाद, मंगळूर आणि चेन्नईसारख्या महानगरात आणखी एका वर्षात भूजल गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो पण हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. वाहून जाणार्‍या या पाण्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत …

Read More »

सिद्धी जगण्याची…

भिकारी म्हटल्यावर एक चिंध्या नेसलेली, अंगावर मळाची पुटं चढलेली, अंगाला वास मारणारी, अपंगत्व असेल तर ते मिरवणारी, राठ वाढलेल्या केसांच्या जटा मिरवणारी, ओंगळवाणी अशी स्त्री वा पुरुष असलेली व्यक्ती चटकन नजरेसमोर उभी राहाते आणि मग आपल्याही नकळत आपलेच अंग चोरले जाते. भिकारी आपल्या जवळपासही फिरकू नये अशी आपली इच्छा असते. …

Read More »

हिमा दास : बावनकशी सोने

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारताची प्रमुख शक्ती म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. नव्या पिढीमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. आज असंख्य तरुण-तरुणी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून स्वतःसह आपल्या देशाचा नावलौकिक वाढविताना दिसून येते. यामध्ये आता युवा धावपटू हिमा दासचे नाव समाविष्ट झाले आहे. हिमाने आपल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उडनपरी’, …

Read More »

सबुरीचे राजकारण हिताचे!

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताज्या मुलाखतीने तो देश लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हे, तर सेनाधिकारी आणि त्यांनी घडविलेले वा स्वतंत्रपणे निर्माण झालेले आतंकवादी कसा चालवीत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते आहे. ही एक स्पष्टोक्ती अशी आहे की ज्यामुळे भारताचे राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघाले पाहिजे. काँग्रेस संस्कृतीने भारतावर प्रदीर्घ काळ राज्य …

Read More »