भविष्यातील संधी शोधत रिलायन्स इंडस्ट्री ही आज भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. बाजार मूल्याचा विचार करता 11 लाख कोटी रुपयांचा टप्पा तर पार केला आहेच, पण गुंतवणूकदारांना तीन महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे! पैसा कोठे फिरतो आहे आणि कसा फिरविला जाऊ शकतो, हे रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या काही महिन्यांत दाखवून …
Read More »Monthly Archives: June 2020
वादळग्रस्त कामगारांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या रोह्यातील निलीकॉन फूड डाईज अॅण्ड केमिकल्स कंपनी युनिट नंबर 1 व 2 आणि सुदर्शन इंडस्ट्रीजमधील 300 कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जय भारतीय जनरल कामगार संघटना व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी दक्षिण रायगड यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे …
Read More »रायगडात नवा उच्चांक; 128 रुग्ण पॉझिटिव्ह
पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी 128 नवीन रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू, तर 56 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 73, ग्रामीणमध्ये 16, अलिबाग 12, पोलादपूर आठ, उरण पाच, कर्जत सात, महाड पाच आणि पेणमध्ये दोन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात …
Read More »काँग्रेसचे नेते लाचार, तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट
राधाकृष्ण विखे-पाटील यांची घणाघाती टीका शिर्डी ः प्रतिनिधीभाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. घाटा नको, वाटा पाहिजे, असे हे राज्य सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. स्वार्थासाठी काँग्रेस नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हाती राहिला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत …
Read More »भाजप कळंबोली मंडलकडून चिनी मालाची होळी
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे देशातील सर्व नागरिकांत चीनविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे चीनचा कोणताही माल खरेदी करायचा नाही, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. याचाच भाग म्हणून भाजपतर्फे चायनानिर्मित टीव्ही, मोबाइल आदी वस्तूंची तोडफोड करून होळी करण्यात आली. यापुढे आम्ही …
Read More »स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना
पंतप्रधानांच्या हस्ते गरीब कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना …
Read More »रिलायन्स टाऊनशिप परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित
पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. परिणामी या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील बी-150मधील रूम नं. बी-149 ते बी-152 रूमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या …
Read More »चिनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
अलिबाग ः प्रतिनिधी सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चीनच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे. त्या अनुषंगाने अलिबागेतील चेंढरे येथे नागरिकांनी एकत्र येत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी नागरिकांच्या हातात चीनविरोधातील घोषणांचे फलक होते, तसेच भारतमाता की जय आणि चीनविरोधात …
Read More »वादळाच्या तडाख्यातही पक्षी घरट्यातच
माणगाव ः प्रतिनिधी संकटांशी जिद्दीने सामना करण्याची पक्ष्यांची अनोखी पद्धत असून 3 जूनला रायगडात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात असेच एक निरीक्षण समोर आले आहे. हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे पशुपक्षी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड देत असल्याचे दिसून आले. निसर्ग चक्रीवादळाचे वारे ताशी 120 किमी वेगाने वाहत होते. या वादळात घरांचे, इमारतींचे व …
Read More »माणगावमधील शेकडो गावे अद्यापही अंधारात
वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. माणगाव नगरपालिका हद्दीतील जवळपास 70 टक्के भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने आता हळूहळू 15 दिवसांनंतर का होईना लोकवसाहती उजळत आहेत. अजूनही 30 टक्के भागातील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत, पण महत्त्वाचा नगरपंचायत पाणीपुरवठा विद्युत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper