Breaking News

Yearly Archives: 2021

बोटी लागल्या किनार्याला

अलिबाग : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर आणण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 29) अलिबाग तालुक्यातील नवेदर नावगाव येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर आणल्या. समुद्रात 1 जूनपूर्वी मासेमारीस …

Read More »

खालापूरच्या सुरक्षेसाठी आता ‘तिसरा डोळा’

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पूर्वी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी खबर्‍यांचे जाळे असायचे. आता बदलत्या काळाप्रमाणे सीसीटीव्ही तंत्रज्ञान पोलीस विभागाकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून, खालापूर येथे लोकसहभागातून सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी …

Read More »

वृक्ष लागवड मोहिमेवर कोरोनाचा परिणाम

रोपांच्या संख्येत घट; यंदाचा लक्ष्यांक घसरला अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 200 झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, मात्र यंदा कोरोनामुळे नवीन …

Read More »

अवकाळी पावसाचा पाणीटंचाईग्रस्त भागाला आधार

कर्जत तालुक्यातील दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र या वर्षी उन्हाळ्यात अनेकदा अवेळी पाऊस आला आणि या अवेळी पावसाने मार्च महिन्यात तळ गाठणार्‍या विहिरींत पाणी साचून राहत होते. दरम्यान, त्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावे आणि 57 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या, मात्र …

Read More »

दुसरी लाट ओसरतेय…

वैश्विक महामारी कोरोनाचा देशात झालेला उद्रेक क्षमताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदरही घटत आहे. सलग दुसर्‍या वर्षी आलेले कोविड-19 विषाणूचे संकट हळूहळू सरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळात यात अधिक सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगात होत्याचे नव्हते …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अशोक कुमार सामनाधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यांत सामनाधिकारी (रेफरी) म्हणून अशोक कुमार यांचा समावेश झाला आहे. कुमार हे एकमेव भारतीय कुस्ती रेफरी म्हणून ऑलिम्पिकमध्ये असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने त्यांना नामांकन दिले आहे. ‘या स्पर्धेत निवडलेला मी एकमेव भारतीय रेफरी आहे. मी …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलत गुण

नागपूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी व नववीतील, तर बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरावीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाविषयीची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व …

Read More »

ट्वेण्टी-20 वर्ल्डकप महाराष्ट्रात?; बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निर्णय एक महिन्याने घ्यावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राचा सर्वोत्तम पर्याय झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. दूरचित्रसंवादाद्वारे 50 मिनिटे चाललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएल आणि …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …

Read More »

लोकसभा निवडणुकीतील ‘दिबां’च्या विजयाने काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… आणीबाणीच्या काळात अनेक गोष्टींवर सरकारने निर्बंध घातले. स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. वृत्तपत्रांवर …

Read More »