Breaking News

संपादकीय

मुलखावेगळा लोकनेता

राजकारणाचा स्तर सध्या कुठल्या दिशेने जात आहे हे आपण सारे रोजच पाहात-ऐकत असतो. एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची चढाओढ लागलेल्या आजच्या काळामध्ये शिवराळ नेतेच प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. राजकारणामध्ये आपण नेमके कशासाठी आलो आहोत याचा जणू या तथाकथित नेत्यांना विसरच पडला आहे. अशा परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेगळेपण झगझगीतपणे उठून दिसते. …

Read More »

माणुसकीचे नाते लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब!

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, माणुसकी म्हणजे निःस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब! नावाप्रमाणेच नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. गरिबीची जाण असणारे …

Read More »

बहुतजनांशी आधारू..!

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः। वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वानवा॥ शंभरात एक माणूस शूर निपजतो, हजारात एक पंडित, दहा हजारांत एखादा वक्ता जन्मतो, तर दानशूर क्वचितच जन्माला येतो, असा उपरोक्त संस्कृत वचनाचा अर्थ आहे. अनेकांजवळ खूप काही असूनही त्यांच्यात दातृत्वाचा अभाव असतो, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की ती …

Read More »

मुलगी शिकली, प्रगती झाली

युपीएससीच्या परीक्षेत एखाद्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. परंतु पहिले तीनही क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत असे गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. 2021 च्या युपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने पटकावला तर कोलकात्याच्या अंकिता अगरवालने दुसरा व चंदीगडच्या गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला. …

Read More »

काश्मीरचे खोरे हळूहळू बदलतेय…

काश्मीर म्हटले की, तेथील दहशतवादी, त्यांचे हल्ले एवढेच आपल्या डोळ्यासमोर येते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे  सरकार आल्यापासून  तेथील परिस्थिती बदलत आहे. तेथील महिलांच्यात ही आत्मविश्वास निर्माण होत आहे, हा बदल निश्चितच चांगला आहे. काश्मीरमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया जवळ जवळ कोणीच करीतच नाही. त्यांना धर्म परवानगी देत नाही असे सांगितले जाते. अशा …

Read More »

पावसाची आनंदवार्ता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाचे नेहमीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत तीन दिवस आधीच, 29 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले आहे. अतितीव्र उष्म्याचा या वर्षी हिवाळी गव्हाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसला. इतका की सरकारला गव्हाची निर्यात रोखावी लागली. आता मान्सूनचे आगमन वेळेआधी झाल्यामुळे देशात भात व तेलबियांचे पीक जोमाने येईल, …

Read More »

कोरोना पाठ सोडेना!

कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असताना दुसरीकडे ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. वैश्विक महामारी मानवाची काही पाठ सोडायला तयार नाही. सलग तीन वर्षे त्याचे सावट कायम आहे. कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत …

Read More »

आदिवासी भागातील कशेळे ग्रामीण रुग्णालय दुर्लक्षित!

कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक विविध सुविधांपासून आजही वंचित आहे. 30 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेड देखील उपलबध नाहीत आणि रुग्णालय सुरु झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाला मिळाले नाही. कर्जत तालुक्यातील अर्ध्या आदिवासी भागातील जनतेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कशेळे गावाची ओळख आहे. आदिवासी …

Read More »

घोडदौडीतील आठ वर्षे

बरोबर आठ वर्षांपूर्वी याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले होते. गेल्या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा ओघ पवित्र गंगेप्रमाणे वाढत गेलेला दिसला. मोदी सरकारच्या आठव्या वाढदिवशी देशभरात फार काही उत्सव वा समारंभ झाले नाहीत. …

Read More »

रायगड जिल्ह्यातील गणवेश वाटपात घोळ?

महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. सदरचे गणवेश शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्थरावरून अनुदान दिले जात असते. मात्र रायगड जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाली असल्याच्या  तक्रारी पुढे आल्या आहेत. रायगड़ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गणवेश वाटप संदर्भातील चौकशी पूर्ण झाल्याशिवाय …

Read More »