Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा -मुख्यमंत्री

बारामती/सुपे ः प्रतिनिधी बारामतीकरांनी सत्तेत असताना शेतीचे सिंचन करण्याऐवजी स्वतःच्या तिजोरीचेच सिंचन केले. परिणामी, जल मिळण्याऐवजी बारामतीच्या जिरायती भागाच्या नशिबी मृगजळ आले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा, पाणी देतो, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले. महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या …

Read More »

पंतप्रधान मोदींना रशियाचा पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संयुक्त अरब अमिरात (यूएई)पाठोपाठ रशियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात पंतप्रधान मोदींनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले. रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द …

Read More »

काँग्रेस आघाडीचा निक्काल लागणार; मोदींचा दावा

भागलपूर : वृत्तसंस्था येत्या 23 मे रोजी केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून, त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांची टुकडे टुकडे गँग तुकडे तुकडे होऊन विखरून जाईल, अशा शब्दांत केंद्रात पुन्हा आपले सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर टीकेचा प्रहार केला. ते बिहार राज्यातील …

Read More »

दिग्गजांचे भवितव्य पणाला; पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील 10पैकी सात मतदारसंघांचा समावेश होता. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 ते 62 टक्के मतदान झाल्याचे यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम …

Read More »

‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील 900पेक्षा जास्त कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे, असे म्हणत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कलाकारांनी मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. शंकर महादेवन, विवेक ओबेराय, पंडित जसराज, रिता गांगुली, कोयना मित्रा, अनुराधा पौडवाल यांच्यासह …

Read More »

गुजरात काँग्रेसला धक्का; अल्पेश ठाकोर यांची सोडचिठ्ठी

अहमदाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश ठाकोरचे जवळचे सहकारी धवलसिंह झाला यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ठाकोर सेना समितीने एक ठराव मंजूर केला असून त्यांनी मला, अल्पेश आणि भरतजी ठाकोर आम्हा तिघांना …

Read More »

लालूप्रसाद यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पाटणा : वृत्तसंस्था चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले 24 महिने ते तुरुंगात आहेत. लालूप्रसादांच्या जामिनाची मागणी करणार्‍या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले …

Read More »

मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच भारतासमवेत चर्चा शक्य -इम्रान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केले आहे. जर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य असून ते पाकसोबत …

Read More »

पवारांकडून जातीचे राजकारण : आढळराव-पाटील

पुणे ः प्रतिनिधी माझ्या 15 वर्षांच्या खासदारकीच्या काळात कोणाचीही जात काढली नाही, पण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल …

Read More »

नक्षलग्रस्त भागात केला जातोय सावध प्रचार

गडचिरोली ः वृत्तसंस्था गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो, पण गडचिरोलीतील दुर्गम भागातील खेड्यांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार केला जातो. पक्षाचे झेंडे घेऊन कोणी फिरत नाही, ना गाडीवर लाऊड स्पीकर लावून घोषणा दिल्या जातात आणि याचे एकमेव कारण म्हणजे नक्षल्यांची भीती. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती, …

Read More »