Breaking News

महत्वाच्या बातम्या

पबजी खेळण्याच्या नादात प्यायला अॅसिड

छिंडवाडा ः कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता …

Read More »

पालकमंत्र्यांमुळे विकासकामांना गती

पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे पेण नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्यापैकी काही विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 6) सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

एअर स्ट्राईकवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार

नवी दिल्ली ः भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर शंका उपस्थित करणार्‍या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलावर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नाही. सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी काँग्रेस नेते कपिल …

Read More »

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका

नौदल प्रमुखांचा इशारा नवी दिल्ली ः समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होऊ शकतो. समुद्रातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असा इशारा भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला. दिल्लीमध्ये इंडो-पॅसिफिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुलवामा दहशतवादी हल्ला कट्टरपंथीयांनी घडवून आणला. त्यांना अधिकृत यंत्रणांची मदत होती. भारताला अस्थिर करण्याचा …

Read More »

‘ते माझ्यावर, तर मी दहशतवाद्यावर स्ट्राईक करतो’

पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात गांधीनगर ः एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात, तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा …

Read More »

जय भारत नाका मित्र मंडळातर्फे व्यापार्यांना डस्टबिनचे डबे

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी व कचरा रस्त्यावर न टाकता तो डस्टबिनमध्येच टाकला जावा या उद्देशाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून जय भारत नाका मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून त्या परिसरातील व्यापार्‍यांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले. मंडळाचे आधारस्तंभ शिरिष बुटाला, अध्यक्ष श्रीकांत वेदक, सल्लागार प्रवीण जाधव, …

Read More »

चिरनेरवासीयांकडून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या वारसांना लाखमोलाची मदत

जेएनपीटी : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना चिरनेर तिरंगा पतपेढी, नागरिक आणि तरुणांनी त्यांच्या घरी जाऊन एक लाखाची आर्थिक मदत केली आहे. चिरनेर भोमच्या माध्यमातून यावर्षीही नुकतेच तिरंगा चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजकांच्या वतीने पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत …

Read More »

दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू

दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू पनवेल : वार्ताहर उरणमधील भेंडखळ येथून खोपटा येथील बामनलॉरी येथे जाणार्‍या भरधाव मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलचालकाचा मृत्यू, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव महंमद अस्लम बग्गा (30), तर जखमी …

Read More »

‘ते’ पत्र मी लिहिलेले नाही : अमिताभ चौधरी

मुंबई : प्रतिनिधी दहशतवाद पसरवणार्‍या देशांशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संबंध तोडावेत, अशी मागणी भारतीय क्रिकेट बोर्डाने केली होती, पण त्यात पाकिस्तानचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला नव्हता. यासंदर्भात बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांना विचारल्यावर आपण ते पत्र लिहिलेले नाही, असे सांगून त्यांनी यासंदर्भात हात वर केले. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

धोनीबरोबर या खेळाडूंचाही हा शेवटचा वर्ल्डकप

मुंबई : प्रतिनिधी स्वतःच्या देशाला एकदा तरी वर्ल्डकप जिंकवून द्यायचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बघतो. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर कित्येकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या क्रिकेट वर्ल्डकपमध्येही अशाच प्रकारे खेळाडू जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरतील. भारताच्या दृष्टीनं विचार केला, तर काही खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. …

Read More »