Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. 16) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे …

Read More »

कर्जत नांगुर्ले मंदिरात श्री मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नांगुर्ले गावात उभारलेल्या दुमजली मंदिरामध्ये जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने चार दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने नांगुर्ले गावात चार वर्षांपासून मंदिर उभारणीचे काम करण्यात येत होते. सुमारे तीस लाख रुपये खर्च करून …

Read More »

वढाव येथील यात्रेत भक्तांचा उत्साह व्दिगुणित

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वढाव गावाची बहिरीदेवाची यात्रा दोन वर्षानंतर या वर्षी मोठया उत्साहात साजरी झाली. या यात्रेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकणातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली होती. देव काठ्यांची स्पर्धा आणि छबिना (पालखी) सोबत आपल्या अंगावर काटेरी …

Read More »

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपक्रम

लोहोप आरोग्य केंद्रात वर्धापन दिनी विविध कार्यक्रम; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद खालापूर : प्रतिनिधी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी या उपक्रमाच्या चौथा वर्धापनदिन खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवैया यांनी आरोग्य …

Read More »

चार दिवस सुट्ट्यांमुळे मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दी

मुरूड : प्रतिनिधी सलग चार दिवस सुट्टी पडल्याने पर्यटकांनी मुरूड येथे येणे पसंत केले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, बोरिवली व विरार आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक मुरूडला आले आहेत. त्यामुळे काशीद व मुरूड येथील पर्यटन व्यसायावर अवलंबून असणारे दुकानदार, हॉटेल मालक, लॉजिंग, स्टॉलधारक, घोडेवाले, टी-सेंटर, शहाळी विक्रेते यांना चांगलाच …

Read More »

माथेरानच्या शारलोट लेकमधील गाळ काढावा

मनसेचे जीवन प्राधिकरणचे उपअभियंता भोसले यांना निवेदन कर्जत : बातमीदार माथेरानला पाणीपुरवठा करणार्‍या शारलोट लेक तलावातील गाळ काढावा, अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्जतचे प्रभारी उपअभियंता सुरेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. माथेरान शहर मनसेच्या शिष्टमंडळाने नुकताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्जत प्रभारी उपअभियंता सुरेंद्र भोसले …

Read More »

निगुडमाळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

माणगाव : प्रतिनिधी मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व सुरेश शंकर उपाध्ये यांच्या आर्थिक मदतीतून व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील मांजरवणे ग्रामपंचायत हद्दीतील निगुडमाळ गावात नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. मराठी अभिनेते अरुण कदम यांच्या हस्ते शनिवारी (दि.16)  या पाणी योजनेचे लाकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबईकर …

Read More »

मुरूड-जंजिरा खोरा बंदराला प्रवासी जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर

मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला प्रवासी शासनाकडून जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र जंजिरा किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढल्याने  समुद्राच्या ओहोटीला प्रवाशी वाहतूक करणार्‍या बोटी जेट्टीला  लागत नाहीत. प्रवाशांना चढणे उताराने त्रासाचे होते. त्यासाठी …

Read More »

झुगरेवाडी शाळेला डिजिटल संच, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्‍या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई …

Read More »

पालीत कचर्‍यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात

वाढता उष्मा आणि चार्‍याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्‍यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे.  ही मोकाट गुरे सध्या …

Read More »