Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माणगाव, पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सन 2021 ते 2025 करिता सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 21)  तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केली. माणगाव प्रशासकीय भवन येथील सभागृहात याबाबत तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली व परी.सहा. जिल्हाधिकारी तथा तहसीलदार माणगाव मैनाक घोष …

Read More »

बर्ड फ्लूची भीती घालविण्याकरिता आज पेणमध्ये मोफत चिकन महोत्सव

पेण ः प्रतिनिधी                                                    बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाणे टाळले आहे, मात्र तज्ज्ञांच्या मते व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव …

Read More »

हेलिपॅडसाठी कर्जत कडाव येथील जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश

अलिबाग : जिमाका हेलिपॅड उभारण्याकरिता कर्जत तालुक्यातील कडाव येथील जमीन (सर्व्हे नं. 132/1/अ) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.  राज्याच्या हेलिपॅड धोरणानुसार सर्व जिल्हाधिकार्‍यांनी  प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करुन जागा निश्चित करणेबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत …

Read More »

माणगाव तालुक्यातील तिलोरे येथील शेततळ्यात आढळली भलीमोठी मगर

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तिलोरे येथे श्री. कासे यांचे शेततळे असून ते त्या तळ्यात मत्स्य व्यवसाय करतात. शेततळ्यात मगर शिरली असल्याचे काही दिवसांपुर्वी त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब माणगाव वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मगर तळ्यात असल्याची खात्री केली. त्या बाबतचा पंचनामाही श्री. वाघमारे यांनी  केला. …

Read More »

पाली (पोटल) आणि अंबेवाडी गावात पाणपोई; परवीन इंडस्ट्रीजचा उपक्रम

कर्जत : बातमीदार सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काही कंपन्या  त्यांच्या सीएसआर फंडातून समाजहिताचे प्रकल्प उभारतात. परवीन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा प्रकाश मित्तल यांनी कर्जत तालुक्यातील पाली (पोटल) आणि अंबेवाड़ी गावासाठी आपल्या कंपनीचा सीएसआर फंड उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून फ़िल्टर वॉटर प्लांट  (स्वच्छ पाणी) योजना राबवून या दोन्ही गावांत पाणपोई …

Read More »

पेणमध्ये 281 कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू; पश्ाुसंवर्धन विभाग सतर्क

पेण : प्रतिनिधी पश्ाुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील पोल्ट्रीतील 562पैकी 281 कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यातील पाच मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवल्या असता ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या पोल्ट्रीच्या 10 किलोमीटर परिसरातील पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. तर …

Read More »

सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; चेंढरेचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील 62ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 21) काढण्यात आली. त्यात 31 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अलिबाग शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी तर वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मन तर्फे झिराड ग्रामपंचायतीचे …

Read More »

खोपोलीमध्ये भरला आठवडा बाजार

खोपोली : प्रतिनिधी अनेक वर्षापासून खोपोलीत बाजारपेठेतील रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार लॉकडाउननंतर प्रथमच गुरुवारी (दि. 21) फुललेला पहावयास मिळाला. खालापूर जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खोपोली शहर हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले ठिकाण आहे. खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ गृहोपयोगी व शेती विषयक सामान खरेदीसाठी खोपोलीत येत असतात. …

Read More »

संजयआप्पा ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

माणगाव : प्रतिनिधी भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 21) इंदापूर तळाशेत येथे त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून ढवळे यांनी आपल्या सहकार्‍यांसह बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात जावून तेथील वृद्धा मंडळींना ब्लँकेट, दिनदर्शिका व खाऊचे वाटप केले. संजयआप्पा ढवळे यांना शुभेच्छा …

Read More »

उपेक्षित कुलाबा किल्ला

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचे मुख्यालय असणारा ऐतिहासिक कुलाबा किल्ला 300 वर्ष समुद्राच्या लाटांचा मारा झेलत उभा आहे. महाराष्ट्राचे वैभव असेलेल्या या किल्ल्याची तटबंदी आता ढासळत आहे. किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यातील इतर किल्ल्यांचे संवर्धन होत आहे, मात्र हा जलदुर्ग आजपर्यंत उपेक्षात राहिला आहे. समुद्र किनारी मौजमजा …

Read More »