कर्जत शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीकडे बघून मन प्रसन्न होत असते, परंतु पावसाळा आला की नदीच्या काठावर राहणार्या रहिवाशांच्या पोटात दररोज रात्री गोळा येतो कारण अतिवृष्टीमुळे ही नदी उलटून तिचे पाणी कधीही कर्जत शहरात घुसत असे. त्यामुळे नदीच्या किनार्यावर असलेल्या रहिवाशांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे. यावर …
Read More »अतिवृष्टीने हाहाकार
गेल्या काही दिवसांपासून पडणार्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली आहे. सततच्या पावसाने चांदा ते बांदा हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, तर राज्यात विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. जून महिन्यात ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्या लोकांवर …
Read More »ई-रिक्षाचे घोडे अडलेय कुठे?
माथेरानकरांचा सवाल; सर्व स्तरांतून सेवा सुरू करण्याची मागणी नेरळ ः प्रतिनिधी माथेरान पायलट प्रकल्पानंतर माथेरानमधील ई-रिक्षांची सेवा बंद आहे. याबाबत संनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, यात ही सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या सदस्यांनीही रिक्षांची सेवा बंद करायला आम्ही कुठे …
Read More »इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची शोधमोहीम थांबवली; 57 जण बेपत्ता
खालापूर, चौक, खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी इर्शाळवाडीत दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी …
Read More »इर्शाळवाडी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि. 22)पासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबिर लावण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत …
Read More »सारडेतील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा
उरण : बातमीदार पिरकोन सारडेगाव रोडच्या कडेला एक लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा उलगडा 16 तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेवुन तपासाला गती दिली. …
Read More »माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने रस्ता झाला खुला
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील नाल्याजवळ झाड तुटून पडल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माजीनगरसेवसक राजू सोनी यांना माहिती देताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी यांचे …
Read More »दुर्दैवाची दरड
दर पावसाळ्यात इर्शाळवाडीसारख्या शोकांतिका घडल्यानंतर बचावयंत्रणा धावून येते. त्यांच्या पाठोपाठ माध्यमांचे कॅमेरे जातात. चार दिवस हळहळ व्यक्त होते. राजकीय नेत्यांचा दुर्घटनास्थळावरील वावर कमी झाला की माध्यमांचे कॅमेरे अदृश्य होतात आणि पुनर्वसनाचे कार्य बंद पडते. हे सारे थांबायला हवे असाच इशारा इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने दिला आहे. पावसाळा ऐनभरात आला की रायगड जिल्ह्यामध्ये …
Read More »खोपोलीतील सुभाषनगर वसाहतीवर दरडीची टांगती तलवार कायम
खोपोली ः प्रतिनिधी शहरातील सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे, मात्र खोपोली पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सुभाषनगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची पहाणी काही वर्षांपूर्वी भूगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित …
Read More »माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली
रात्रभर रस्ता बंद; 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊस नेरळ ः प्रतिनिधी हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाटरस्त्याला बसला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper