पेण : प्रतिनिधी येथील बीबीएनजी आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकाच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन पेणमधील महात्मा गांधी मंदिर सभागृहात करण्यात आले होते. या प्रदर्शनचे उद्घाटन पितांबरीचे मालक रविंद्र वामन प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बीबीएनजी अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, संजीव जोशी उपस्थित होते. रविंद्र …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांनी घेतले बल्लाळेश्वराचे दर्शन
पाली : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त पेण-सुधागड-रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 15) पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मतदारसंघात सुख, समृद्धीची मागणी बल्लाळेश्वराकडे केली व आशीर्वाद घेतले. आमदार पाटील यांनी येथील नियोजन व व्यवस्थापनाचा आढावादेखील घेतला. त्यांच्यासमवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »उसतोड कामगाराचा मुलगा जाणार जर्मनीला
कर्जत : बातमीदार नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेला ऊसतोड कामगारांचा मुलगा अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघाला आहे. पालघरमधील एका ट्रस्टने त्या विद्यार्थ्यांला उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. सोमवारी (दि. 15) या विद्यार्थ्याला शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तरेश्वर शेप हा बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा. मुलांना आपल्याप्रमाणे …
Read More »बोरघाटात यमराज अवतरले; वाहनचालकांना पटवून दिले वाहतुकीचे नियम; पार्ले बिस्कीट कंपनीचा उपक्रम
खालापूर : प्रतिनिधी राज्यात 32व्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून त्या अनुषंगाने बोरघाट पोलीस केंद्र आणि पार्ले बिस्किट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरून वाहतूक करणार्या वाहनचालकांना वाहने थांबवुन वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. मुंबई-पुणे …
Read More »कोरोना पुन्हा डोके वर काढतोय!; नेरळमध्ये एकावेळी चार रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गंगानगर भागात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना झाल्याने नेरळमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच इमारतीच्या बाजूला रविवारी मोठ्या जोषात साखरपुडा समारंभ झाल्याने या समारंभातून कोरोना पसरणार तर नाही ना? अशी देखील भीती आरोग्य विभागाला आहे. कर्जत तालुक्यात मागील दोन महिन्यात कमी झालेल्या …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; स्कायवॉक, पादचारी पूल, सरकते जिने व अन्य सुविधांची तरतूद
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात स्काय वॉक, दोन नवीन पादचारी पूल, सरकता जिना, प्रवाशांसाठी निवारा शेड आदी बर्याच कामांचा समावेश आहे. नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक असून या स्थानकातून माथेरानकरिता मिनिट्रेन सोडली जाते. या मिनिट्रेनचा मार्ग, इंजिने …
Read More »अलिबागच्या जिल्हा रुग्णालयाला घरघर; आरोग्य खात्याकडून नवीन इमारतीची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. इमारतीच्या आंतररुग्ण विभागातील छताचा स्लॅब पुन्हा कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. त्यामुळे चाळीस वर्षे जुन्या झालेल्या या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980-81 मध्ये बांधण्यात आली आहे. या दोन …
Read More »रायगडात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा
पालीत फुलला भक्तिमळा पाली : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त सुधागड तालुक्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उपनगर व अन्य शहरातून भाविक आले होते. त्यामुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर भाविकांनी फुलून निघाला होता. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. ठिकठिकाणाहून आलेल्या पालख्यादेखील …
Read More »शिवकालीन पेठ किल्ला प्रवेशासाठी 50 रुपये शुल्क
कर घेऊ नये-स्थानिकांची मागणी; रोजगार बुडत असल्याने ग्रामस्थ संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोथळीगड म्हणजे पेठ किल्ल्यावर प्रवेशासाठी वन विभागाने 50 रुपयांचे शुल्क लावले आहे. त्यामुळे पर्यटक आणि गडप्रेमी यांचे गडावर फिरकणे बंद झाले असून, स्थानिक पेठ ग्रामस्थांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शुल्क घेण्यास विरोध केला असून, प्रवेश शुल्क …
Read More »रायगडात अपघातांचे प्रमाण घटले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे …
Read More »