Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सडलेल्या जलवाहिन्यांतून श्रीवर्धनला पाणीपुरवठा

श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानवली धरणातून श्रीवर्धनला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ती जीर्ण झाल्याने त्यातून अनेक वेळा गंजयुक्त व शेवाळयुक्त पाणी येते, तसेच ही जलवाहिनी ठिकठिकाणी फुटण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेचा …

Read More »

पोलादपूर-खेडदरम्यान महाकाय भुयारी मार्ग

पोलादपूर ः प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वांत मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूरमधील भोगाव …

Read More »

रायगडात पर्यटनवृद्धीसाठी अधिक सेवासुविधांची गरज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी आहेत, मात्र पर्यटनवाढीसाठी अधिक सेवासुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे सोमवारी (दि. 3) राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस …

Read More »

माथेरानमधील दोन दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही, नागरिकांमुळे आग आटोक्यात

कर्जत : बातमीदार माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रोहित टी अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक या दुकानाला रविवारी रात्री 1:30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन आणि नागरिकांमुळे ही आटोक्यात आणण्यात यश आले. माथेरान येथील हे शॉपिंग …

Read More »

जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक -कुलगुरू डॉ. संजय सावंत

कर्जत : बातमीदार : भाताच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी लागणारा  कालावधी कमी करण्याची गरज असून, गतिशील संकरिकरणासाठी जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी येथे केले. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या 54 व्या महाराष्ट्र …

Read More »

‘आरोग्यवर्धक जीवनासाठी योगासने आवश्यक’

पेण : प्रतिपादन : आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार व योगासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी येथे केले. पेण नगर परिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने यांच्या पुढाकाराने डॉ. भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर हॉल येथे महिलांसाठी सूर्यनमस्कार व योगासने विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …

Read More »

बेटी बचाओ, बेटी पढाओनिमित्त प्रभात फेरी

पोलादपूर : प्रतिनिधी : बेटी बचाव बेटी पढाव सप्ताहानिमित्त येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूरमध्ये नुकताच प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रभातफेरीच्या शुभारंभाला पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, गटशिक्षणाधिकारी साळुंखे, …

Read More »

निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पेणमध्ये मॅरेथॉन

पेण : प्रतिनिधी शरीर निरोगी राहावे यासाठी किमान एक तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदरतेबरोबरच स्वास्थ्यपूर्ण पेण ही संकल्पना अमलात आणण्यासाठी व याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून पेण नगर परिषदेने मॅरेथॉन आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) येथे काढले. मिनी …

Read More »

डॉक्टर नसल्याने बालकाचा मृत्यू; सुकेळीतील जिंदाल रुग्णालयाला ठोकले टाळे

नागोठणे : प्रतिनिधी सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या बी. सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी आणलेल्या तीन महिन्यांच्या आदिवासी बालकाचा रविवारी (दि. 2) मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पनवेलला नेत असताना महामार्गावर वडखळनजीक त्याला मृत्यूने गाठले. ही घटना कळल्यावर संताप …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या समाधीपुढे राज्यपाल नतमस्तक; किल्ले रायगडची केली पाहणी

महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून, रविवारी (दि. 2) दुपारी त्यांनी किल्ले रायगडला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे ते नतमस्तक झाले. राज्यपालांचे महाड एमआयडीसीतील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर तेथून ते पाचाड येथे आले. तेथे त्यांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप …

Read More »